निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याच्या दरात 500 ते 800 रुपयांची वाढ
कांदा निर्यातबंदी हटवल्याने लासलगाव बाजार समितीत कांदा बाजारात परिणाम दिसू लागले आहे. कांद्याच्या भावात 500 ते 800 रुपयांची वाढ झाली आहे. कांद्याच्या बाजार भावात वाढ झाल्याने कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापाऱ्यांची नाराजी अजूनही कायम आहे. कांदा निर्यातबंदी दरम्यान झालेले नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. लासलगाव बाजार समिती कांद्याला मिळाला जास्तीत जास्त 2551 रुपये, तर सरासरी 2100 रुपये तर कमीतकमी 800 रुपये बाजार भाव मिळाला आहे.